Thursday, September 19, 2013

HUSNA....A Musical Emotional Treat!!!



           पियुष मिश्रा हे अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वपरिचित आहेतच,मुख्यत्वे त्यांच्या Rockstar आणि Gangs of vaasyepur मधील अभिनयाने त्यांचा चाहता वर्ग वाढला आहे.
     त्यांना २००३ च्या झी सिने अवार्ड्स मध्ये उत्कृष्ट संवाद लेखक म्हणून "Legend  of  Bhagatsing " या  सिनेमा साठी पारितोषिक मिळाले होते.तसेच २०१०  मध्ये गुलाल या सिनेमासाठी Stardust awards मध्ये संगीत दिग्दर्शनातील उत्कृष्ट कामगिरी साठी गौरविण्यात आले.
          तर अशा या अष्टपैलू कलाकाराने लिहिलेलं,  संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं गाणं म्हणजे "हुस्ना"! खरतर १५ वर्षांपूर्वीच पियुष मिश्रांनी लिहिलेलं हे गाणं १४ जुलै २०१२ रोजी M TV Coke  Studio -2 च्या दुसऱ्या भागात हितेश सोनिक आणि मिश्रांनी  नव्याने सादर केल.
   फाळणीच्या वेळी एकमेकांपासून  कायमचे दुरावलेल्या प्रियकराने आपल्या पाकिस्तानात असणाऱ्या प्रेयसीला  पत्रात विचारलेले हळवे, भावपूर्ण प्रश्न म्हणजे हे गाणं! आयुष्यात पुढे जात असताना मनात कुठेतरी जपून ठेवलेल्या प्रेयसीच्या आठवणी, विरहाची सतत बोचत असणारी सल, आयुष्यात पुन्हा कधीच तिला ला भेटता नाही येणार...पाहता नाही येणार  यामुळे आलेली असहायता,अगतिकता शब्दांद्वारे आणि हळुवार चालीमुळे हृदयस्पर्शी ठरते...मन हेलावून टाकते...डोळ्यांच्या कडा ओलावते...

 http://lyricsdna.com/songs/lyrics/husna-coke-studio-mtv-india-piyush-mishra-hitesh-sonik#ixzz2dIR4dzdb

      आपल्या माणसांपासून दुरावल्याच दुक्ख सहन न झाल्याने जसं भारतीय दर रात्री रडतात तसेच पाकिस्तानातही होते का?? ईद च्या वेळचे नमाज,शेवय्यांची खीर...दिवाळीतला दिव्यांचा प्रकाश... बैसाखी,होळी,लोह्डी सारखे अनेक सण आजही त्या दुसरा मुल्क (देश) म्हणविल्या जाणाऱ्या पाकिस्तान  मध्ये पूर्वीसारखेच  साजरे होतात  का? या आणि अशा अनेक वेळी एका  प्रियकराने आपल्या प्रेयसी सोबत घालवलेले सुंदर क्षण आणि फाळणीनंतर त्याच क्षणांसाठी आसुसलेल्या अस्वस्थ मनाचे प्रश्न अंगावर काटा उभा करतात.    
    अतिशय सुंदर शब्दांत मांडलेली प्रियकराची व्यथा तितक्याच ताकदीच्या संगीता मुळे परिणाम साधून जाते.guitar चा आणि भारतीय वाद्यांचा घातलेला सुरेल मेळ फाळणीच्या वेळचा काळ..विरहाने होणारी दोन जीवांची घालमेल थेट हृदयापर्यंत पोहचवते. तो काळ लक्षात  घेऊनच भावना पोहचवण्यासाठी केलेला उर्दू मिश्रित हिंदीचा वापर निव्वळ  लाजवाब...
    खरे पाहता हे गाणे म्हणजे केवळ दोन प्रेमी जीवांची  मांडलेली  व्यथा नव्हे तर फाळणी मुळे एकमेकान पासून कायमचे दुरावलेल्या हिंदुस्तानची म्हणजेच फाळणी नंतरच्या भारत आणि पाकिस्तानची व्यथा आहे. फाळणीमुळे कैक घरे उध्वस्त झाली...अनेक नाती तुटली...कितीतरी लोक आपल्या  नातलगाना..प्रियजनांना कायमचे गमावून बसले..हजारो लाखो लोकांच्या सबंध आयुष्याची फाळणी झाली...आणि त्यांच्याच  विदारक्तेचे... असाह्यतेचे  प्रतिक म्हणजे हुस्ना...
       हे गाणं आशय आणि संगीत या दोन्ही बाजूनी परिपूर्ण ठरत, त्यामुळेच ते classes सोबत masses ला देखील भावत.एकाच वेळी प्रेम, दुक्ख, अस्वस्थता या भावना हे गाणं ऐकताना अनुभवायला मिळतात त्यामुळेच ते  ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करून जात एवढ निश्चित!
        
 

No comments:

Post a Comment